Posts

Showing posts from September, 2020
 अभिमान कुणी वैराग्याचा, कुणी भक्तीचा, कुणी ज्ञानाचा अभिमान धरतो. कुणी योगमार्गाचा, कुणी भक्तपणाचा, नानात-हेचे अभिमान नाना लोक धारण करतात. ते जो आनंद त्यातून लुटत असतात तो त्यांच्या अभिमानाचा आनंद असतो. तो त्यांच्या ख-या स्थितीचा आनंद नसतो. कीर्तन करत असताना, कीर्तन ऐकत असताना जो आनंद प्रगटत असतो तो त्या कीर्तनाच्या स्थितीचा आनंद असतो. आत्मस्थितीच्या ठिकाणी तो नाही. तो आत्मस्थितीचा आनंद या सर्व आनंदाचे माहेरघर आहे. शब्द ऐकण्याची जरुर नाही. बोलण्याची जरुर नाही. कोणता स्पर्श घडण्याची जरुर नाही. कोणता रस चाखण्याची गरज नाही. कोणते रुप पाहण्याची गरज नाही. रुप लावण्य दाखवण्याची गरज नाही कोणत्या गंधाची सुद्धा त्याला गरज नाही. असा शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध यांची अपेक्षा न करता जो आनंद आपल्या अंतरी अखंड स्थित आहे, असा तो आनंद आहे. तो आनंद या कीर्तनावाचून, भजनावाचून, श्रवणभक्तीवाचून अंगचाच आहे. त्यासाठी आपल्याला योगाभ्यासाची गरज नाही. प्राण ब्रम्हांडाला नेण्याची गरज नाही. कारण तो आनंद ही एक आपली स्वाभाविक स्थिती आहे. तो प्राप्त करायची गरज नाही कारण आपणच आनंदरुप आहोत.  आपण आनंदरुप कसे आ...
 विभक्त भक्ती हे भक्ता, हे टिळे-माळे तू कशासाठी लावले आहेस? तू कुणाची यात्रा करुन राहिला आहेस? तू कुणाची भक्ती करुन राहिला आहेस? कुणाचे भजन करतो आहेस? कुणाची ओढ तुला लागली आहे?  स्वतःकडे तू कधी पाहशील? स्वतःची ओढ तुला कधी लागेल? स्वतःची भक्ती तू कधी करशील?  जर स्वतःची भक्ती तुझ्याकडून घडेल तरच त्या परमेश्वराची भक्ती तुझ्याकडून घडेल कारण तो परमेश्वर तूच आहेस. या सृष्टीमध्ये जी जी नाना योनींची अनेक रुपे आहेत त्या नाना रुपांच्या ठिकाणी असलेला अंतरात्मा तो तू स्वतःच आहेस. तुझे दैवत विठोबा, त्याचा अंतरात्मासुद्धा तू स्वतःच आहेस. हा अनुभव म्हणजे भक्ती होय. त्या सर्वांच्या अंतरात्म्याशी एकरुप असण्याचा जो अनुभव आहे, तो अनुभव म्हणजे त्यांच्याशी विभक्तपण नसणे आणि हीच आहे भक्ती!  त्यांच्याशी विलग राहून, दूर राहून, त्यांच्याशी एकरुप न होता, त्या अंतरात्म्याशी मग तो देवाचे असोत, परमेश्वराचे असोत का कोणाचेही असोत; त्यांच्या अंतरात्म्याशी एकरुप होणे हे अपरिहार्य आहे. जर तू तुला एकरुप झालास तरच भक्ती म्हणजे ऐक्य घडेल. हे घडण्यासाठी तू काय करुन राहिलेला आहेस? हा गंध, टिळे लावणे, माळा...
 ओळख अरे पाण्या, तुला कसली तहान लागलेली आहे? तुला पिऊन सर्व सृष्टी तृप्त होते. तुला कसली तहान लागलेली आहे? कशासाठी तू हे जप-तप, यज्ञ-यागादी करतोस? शरीराला, मनाला कशासाठी तू जाळून राहिलेला आहेस? कुणाची भक्ती तुला मिळवायची आहे? कुणाचे ज्ञान तुला प्राप्त करायचे आहे? कुणावर तुला प्रेम करायचे आहे? बाबारे, हा तुझा ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, तपमार्ग, कर्ममार्ग हा तुझा द्वैत मार्ग म्हणजे खरोखर भ्रममार्ग आहे. श्रममार्ग आहे. यातून भ्रम आणि श्रमच प्राप्त होणार. यांत विश्रांती नाही. म्हणून या सर्व मार्गापासून विश्राम पाव.  बाबारे, तो तुझ्या घरातच स्वतः आहे. इतर घरी जाण्याचा काही प्रश्नच नाही. कशाला घरातल्या घरात सारखा फिरतो आहेस? डोळे मिटून तू कोणत्या देवांचे ध्यान करीत आहे? डोळे उघडून स्वतःकडे पहा, त्या देवांचाही देव तू स्वतःच आहेस. हे चैतन्यमय महाप्रभू, तू कोणत्या मार्गाचा उपदेश करतोस? कोणावर प्रेम करायला सांगतोस? ज्याच्यावर प्रेम करायची तू शिकवण देतो तो श्रीकृष्ण परमात्मा तू स्वतःच आहे. जरा पहा, तू परमेश्वरावर प्रेम करण्याची गोष्ट करतो, स्वतःवर प्रेम कधी करशील? ज्याला स्वतःवर प्रेम करता य...
 बावनकशी सोनं       अरे परमहंसा, एका ठिकाणी बसण्यासाठी तुला काही श्रम करावे लागतात काय? पंखाच्या भरा-या सुटल्या, पंख आपल्यामध्ये लपेटून घेतले. आता विश्राम प्राप्त करुन घेण्यासाठी तुला काही खटपट करावी लागते काय? स्वाभाविकरितीने भरारी सोडून दिले आणि तू एका ठिकाणी बसलास. त्याबरोबर स्वाभाविक असा विसावा तुझ्या ठिकाणी आहेच की! तो कां प्राप्त करुन घ्यावा लागतो? नाही! तो अंगचाच आहे. त्याप्रमाणे ही ब्रम्हस्थिती मूळचीच आहे. ती प्राप्त करुन घ्यावी लागत नाही. प्राप्त करुन घेण्यासाठी काही उठाठेव करावी लागत नाही. उलट उठाठेव सोडणे हेच येथे महत्वाचे आहे. त्यामुळे ध्यानाने ते प्राप्त करणे किंवा ज्ञानाने ते मिळविणे किंवा भक्तीने ती प्राप्त करणे किंवा स्वतःला आत्मा समजून तिच्यापर्यंत म्हणजे परमात्म्यापर्यंत धावण्याची कल्पना करणे किंवा तो प्रेमास्पद आहे त्याच्यावर मी प्रेम केले पाहीजे, त्याने परमात्म्यावर प्रेम केले पाहिजे याची या ठिकाणी गरज नाही. काहीही करण्याची गरज नाही. असे तुम्ही आहात. तुम्हाला तुमच्यापर्यंत येण्याची काही जरुरत नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी पहिल्यापासून आहातच. पैलतीरा...